सूर्य फिरला
सावली फिरली
डोक्यावरची
छाया गेली
बदलला ऋतू
उडाले पक्षी
सोबत राहतील
वाटलं होतं
भूकंप येताच
पडली घरे
खंबीर उभी
केली होती
उतार होता
वाहिली नदी
समुद्राकडं
गरज नव्हती
आल्या समस्या
बदलली माणसं
साथ देतील
वाटलं होतं
-रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
साथ
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, मराठी, मराठी कविता, रोहन जगताप, साथ
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment